Thursday 12 January 2017

पुनश्च हरी ॐ

टिळकांची मुदलातली धार आहेच या वाक्याला... आणि नवीन वर्षावर तुटून पडायला हत्यार धारदार हवंच.
तसं तर मुंबईत या पिढीत मजेत हसत खेळत वाढलेला असल्यामुळे फाळणीचा/भूकंपा/पुराचा व्यक्तिश: अनुभव नाहीच...
पण समृद्धी, मायेची माणसं, तगडी सपोर्ट सिस्टीम सगळं तोडून मोडून गेल्यावर परत शून्यातून सुरुवात करताना
असंच एखादं वाक्य घशातले आवंढे गिळत छातीचा दगड करत त्या निर्वासितांनी म्हटलं असेल का?
अरे हो... नाही कसा २६ जुलैला स्वतःचं आणि मित्रांची घरं पुरुषभर पाण्यात तरंगताना बघितलीयतच की...

पण खंत करण्याचा पॉईंट नाहीच आहे ना वरच्या वाक्याचा... आपलं ठरलंय तसं.
पॉईंट आहे तो टिळकांच्या क्लिनिकल शांतपणे पुढची लॉजिकल स्टेप उचलण्याचा...
घर गेल्यावर...
जॉब गेल्यावर...
ब्रेकअप झाल्यावर...
व्यसन सुटल्यावर...
पुरेसं दुःख करून त्या त्या जखमेची देणी देऊन झाली की...
एक दिवस शांतपणे पुढे चालायला लागण्याचा...
परत वीटेवर वीट जोडण्याचा :)

सो पुनश्च हरी ॐ

-नील आर्ते